1973 मध्ये लिहिलेलं एक पुस्तक, ज्याच्यावर खूप टीका झाली. तेच पुस्तक, आज पन्नास वर्षांचा कालावधी उलटल्यावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, जागतिक परिस्थितीत प्रचंड बदल घडून आल्यावर परत एकदा उपयोगी पडू शकते यात लेखकाची दूरदृष्टी म्हणायची? प्रगत जगाचे अपयश म्हणायचे? का तेव्हा पुस्तकातून शिकायची वेळ आली नव्हती असे समजायचे?